ब्लॉग

…तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना यथोचित अभिवादन होईल..

‘कोरोना’ मुळे यावर्षी (2020) ‘भीमजयंती’ प्रत्येकाला घरीच साजरी करावी लागणार आहे. असा एवढा रिकामा वेळ कधीच मिळणार नाही तर बाबासाहेबांचे साहित्य वाचून तो सत्कारणी लावता येऊ शकतो.. तसा प्रयत्न प्रत्येकानेच करायला हवा अस मला वाटते. कारण ते बाबासाहेबांना खरे अभिवादन असेल..

गत 60/70 वर्षात बाबासाहेबांमुळे आपण इथपर्यंत आलोय हे कोण नाकबूल करेल!

पण काही गोष्टी ह्या नेहमी अस्वस्थ करतात. आपण या जयंतीनिमित्त त्यावर गांभीर्याने विचार करून कृती कार्यक्रम हाती घ्यायला हवा असं मला प्रकर्षाने वाटते. त्या बाबी पुढिलप्रमाणे..

1) शैक्षणिक क्षेत्रात हक्काच्या शाळा, काॅलेजससह जागतिक लेवलचे उच्च शिक्षण देणार्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स उभ्या करता येऊ शकतात त्यासाठी तसे सामुहिक प्रयत्न करणे..

2) काळाची पाऊले ओळखत हक्काच्या सहकारी सोसायट्या बँकींग प्रणाली उभ्या करण्यासाठी तसे जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत ते करणे..

3) उद्योग क्षेत्रात आपल्या हक्काचे प्रस्थ निर्माण करण्यासाठी जागतिक बाजारपेठेचा योग्य अभ्यास करून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करण्यासाठी तशी रणनिती उभी करता येईल का व ती कशी करता येईल याचा विचार करणे प्लान बनवणे..

4) धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याकरिता तसे इन्फास्ट्रक्चर उभे करण्यासाठी बौद्ध राष्ट्रांशी समन्वय साधणे नेहमीसाठी त्यांच्याशी एक अॅटॅचमेंट तयार करणे तशी यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांची मदत घेणे.

5) महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात प्युअर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारा उच्च प्रशिक्षित भिक्खू संघ निर्माण करणे. त्यांच्या प्रशिक्षणांचे देशातील राज्याराज्यात महत्वाच्या शहरांत प्रमुख केंद्र उभे करणे.

6) बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचे यथोचित रक्षण करण्याबरोबरच बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध विचार बौद्ध राष्ट्रांत नेण्यासह जगातील प्रमुख देशांत प्रचार-प्रसाराची संभाव्य यंत्रणा उभी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे..

7) ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ सह बाबासाहेबांच्या सर्व ओरिजनल ग्रंथांचा जगातील प्रमुख राष्ट्रांत प्रचार-प्रसार करण्यासाठी तशी नियोजनपूर्वक यंत्रणा उभी करणे..

8) महाराष्ट्रासह देशातील बुद्धकालीन ऐतिहासिक वारसा असणार्या ऐतिहासिक लेण्या, स्तुप, स्थळांचे संवर्धन करण्यासाठी एक दीर्घकालीन कृती आराखडा तयार करणे.

9) बोधगया येथील महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी नियोजनपूर्वक योग्य प्लॅन वर्कआऊट करणे.. बौद्ध विहार हस्तगत करणे. तिथे बौद्ध धम्माचे आंतरराष्ट्रीय प्रचार-प्रसार केंद्र बनवणे.

10) आपल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकदृष्या एकत्र येण्यासाठी देशव्यापी राष्ट्रीय स्तरावर कोअर कमिटी असण्यासंबंधाने तशी व्युहरचना करणे..

11) आरएसएस-भाजपाला सर्वांगाने काऊंटर करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने दीर्घकालीन कृती आराखडा तयार करणे. यासह देशाची सत्ता हस्तगत करण्यासाठी तसा सर्वसमावेशक प्लॅन तयार करणे..

12) महाराष्ट्रासह देशातील जसे की, प्राध्यापक, वकिल, डाॅक्टर, इंजिनिअर, अधिकारी, उद्योजक, महिला आघाडी, यासह फुल टाईम काम करणार्या लोकांची एक व्यापक विंग तयार करणे..

13) लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर योग्य रितीने संविधानाला अभिप्रेत आदर्श काम करणारा महाराष्ट्रासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लेवलचा मिडिया उभा करणे..

14) वाढते खाजगीकरण कमी होत असणार्या सरकारी नोकर्या यावर समांतर कार्यक्रम तयार करणे. समाजाची हक्काची इकाॅनाॅमी तयार करण्यासाठी तसे जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, त्यासाठी तसा प्लॅन बनवणे..

15) स्ट्रक्चरल वर्क उभे करणे, समाजाला सर्वार्थाने प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी नियोजनपूर्वक प्लॅन बनवणे, तशी वाटचाल करणे..

यासह अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे मित्रांनो. केवळ नकारात्मक विचार करून चालणार नाही तर आपल्याला काय करता येऊ शकते..या परिस्थितीतुन कसा मार्ग काढता येऊ शकते याचा प्लान बनवायला हवा अस मला वाटते..

हे कधी ना कधी आपल्याच करावे लागेल म्हणून लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यासाठी आतापासून विचार मंथन सुरू करणे..

या सोबत आपणही आपले विचार, मनातील कल्पना इथे अॅड करू शकता, नव्या संकल्पना मांडा..
चर्चा घडून जाऊद्या…

-संतोष आगबोटे, कंधार जि.नांदेड