ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना गुरा-ढोराप्रमाणे वागणूक मिळत होती. कामगारांना 12-12 तास काम करावे लागत असे. एवढे कामे करून सुद्धा भारतीय कामगारांना योग्य ती वागणूक मिळत नव्हती. ब्रिटिश काळात भारतीय कामगारांना मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती. इंग्रजांच्या आठवड्याच्या पगार नियमानुसार एका वर्षात 52 आठवडे होत असे आणि त्याप्रमाणे कामगारांना पगार मिळत असे. इंग्रजांच्या पगार […]
आंबेडकर Live
खंडाळ्याच्या हाॅटेलचा किस्सा : आपले बाबासाहेब जेवायला आलेत, तुमचं माझ भाग्य समजा
सन १९४२.मुंबई-पुणे हायवेवर निसर्गरम्य वातावरणात वसलेले त्याकाळातील सुप्रसिद्ध खंडाळा हाॅटेल.श्रीमंती थाटमाटातलं उंची हाॅटेल म्हणून त्याची गणना होत असे.हाॅटेल उंचशा टेकडीवर बांधण्यात आलेलं होतं.त्याच्या सभोवताली घनदाट झाडी.उत्तर बाजूला ऐतिहासिक राजमाची किल्ला,त्याच्या खालच्या दिशेला काचळदरी,दक्षिणेला नागफणी…भोवताली सह्याद्रीची गिरीशिखरं.पारशीबाबाचे हे हाॅटेल तिथल्या रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध होतं.पारशी पध्दतीची मटण बिर्याणी,हैद्राबादी बिर्याणी हे या हाॅटेलचे वैशिष्ट्य होतं. नोव्हेंबरमधल्या कडाक्याच्या थंडीने […]
डॉ. आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी राहते घर आणि छापखाना विकावा लागला
६ डिसेंबर १९५६ महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस… अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती… नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती… प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता… त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली… आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेला अवघा […]
लांडोर बंगला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर; या ऐतिहासिक प्रसंगाला यंदा ८५ वर्षे पूर्ण
धुळे येथील लळिंगच्या निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती तेवत उभा आहे. या ठिकाणी बाबासाहेब तीन दिवस मुक्कामी होते. या ऐतिहासिक प्रसंगाला यंदा ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी ३१ जुलैला या ठिकाणी ‘भीमस्मृती यात्रा’ भरविली जाते…. ‘बाबा’ आले कळले जनाला धावली दुनिया बघाया भिमाला। हर्ष झाला दलित दीनाला रंजल्या-गांजल्या पीडित […]
१९४८ सालीच डॉ.आंबेडकरांनी ठणकावून सांगितले ‘मुंबई महाराष्ट्राची’
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (29 जुलै) मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना “मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही,” असं वक्तव्य करून मराठी माणसांसह महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबईच्या उभारणीत मराठी लोकांच्या कर्तृत्व, कष्ट आणि कर्तबगारीवर झाली असल्याचे […]
डॉ. आंबेडकर यांचा रहिवास लाभलेला ‘गोविंद निवास वाडा’ कोसळला; महाडमध्ये व्यक्त होतेय हळहळ..
महाडचे थोर समाजभूषण सुरबानाना टिपणीस यांच्या ‘गोविंद निवास’ या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. त्यांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय प्रसंग आजही रोमांच उभे करतात. ही पवित्र वास्तू नुकतीच जोरदार अतिवृष्टीमुळे कोसळली…. आंबेडकरी चळवळीत महाड शहराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झालेला महाड चवदार तळे सत्याग्रह […]
देशभरातील वंचितांना आरक्षण देणाऱ्या बाबासाहेबांना फी भरून शाळेत प्रवेश घेतला होता
डॉ.बाबासाहेबांनी शिक्षणाची कास धरली नसती तर चळवळीची क्रांती घडलीच नसती. त्यांच्या क्रांतीच्या अनेक घटनांनी एक नवा इतिहास घडवला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजात प्रचंड जागृती निर्माण झाली. आज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन यानिमित्त… ज्ञानरूपी आकाशात आपल्या विलक्षण प्रतिभेने तेजस्वी वलय निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जीवनात […]
बाबासाहेबांवर आधारित असलेले हे २१ चित्रपट पाहिलात का?
1) 2000 – जब्बार पटेल यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, त्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. 2) श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका […]
…म्हणून बाबासाहेबांनी निजामाच्या प्रलोभनांना नकार देत इस्लामचा मार्ग नाकारला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी […]
संसद भवनाच्या आवारात उभारलेल्या डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात इ.स. १९६७ मध्ये उभारलेला पंचधातूचा पुतळा आहे. बी.व्ही. वाघ यांनी हा पुतळा बनवलेला असून आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिवाय एकूण १२.५ फूट उंचीचे आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची रचना हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या […]