डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्म स्वीकारण्याचा आपला विचार पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी १९५६ या वर्षाची १४ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थळ निश्चितीही करणे आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी स्थळ निश्चिती करतानाही सखोल विचार करूनच निर्णय घेतला. नागपूर येथे धम्म दीक्षा घ्यायचे निश्चित केले. धम्म दीक्षेच्या कार्यक्रमासाठी नागपूरची निवड करताना त्यांनी नागपूरचे ऐतिहासिक […]
आंबेडकर Live
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाडची परिषद आणि गंधारपाले लेणी
महाडची सत्याग्रह परिषद दिनांक २५ ते २७ डिसेंबर १९२७ रोजी भरविण्यात आली होती. त्या परिषदेची पूर्वतयारी करण्याकरीता अनंत विनायक चित्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ते पंधरा दिवस अगोदरच महाडमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी महाडमध्ये त्यांना सत्याग्रहाबद्दल प्रतिकूल मत असल्याचे दिसले. तसेच परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी विघ्ने उत्पन्न करून परिषदेला कोणत्याही प्रकारचे सामान मिळू द्यायचे […]
आम्ही महार असतो तर – आचार्य प्र.के.अत्रे
हा प्रश्न गेले कित्येक दिवस आम्ही आमच्या मनाला विचारीत आहोत. गेल्या महिन्यात नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दोन लाख महार यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पुढल्या महिन्याच्या सोळा तारखेला मुंबई येथे दोन-चार लाख महारांना बाबासाहेब बुद्धधर्माची दीक्षा देणार आहेत. भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रचंड लाट या देशातील अस्पृश्य समाजामध्ये उटलेली आहे. बुद्धधर्मी झालेल्या […]
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे बाबासाहेबांवर असलेले प्रेम…
अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता. अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना […]
दामोदर प्रकल्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर ७७ वर्षापूर्वी १७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. […]
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मसाई पठाराची सहल
२५ डिसेंबर १९२६ ते ५ जानेवारी १९२७ अखेर नाताळच्या सुट्या असल्याने कोर्ट कचेऱ्या बंद होत्या. या कालावधित डाॅ.आंबेडकर, सी.ना.शिवतरकर व कापड व्यापारी गायकवाड यांचेसह विश्रांतीसाठी पन्हाळ्यात आले होते. येण्याआधी दत्तोबा पोवार व करवीर संस्थानाधिपती यांना पत्र लिहून पन्हाळा येथे राहण्याची व्यवस्था करणेविषयी कळविले. त्याप्रमाने पन्हाळ्यावरील संस्थानच्या तीन नंबरच्या बंगल्यात राहणेस त्यांना परवानगी मिळाली होती. कोल्हापूर […]
असं आकाराला आलं आपल्या बाबासाहेबांचं ‘राजगृह’
ज्ञानाची प्रचंड भूक असलेल्या बाबासाहेबांची विद्यासंपन्न होण्याची अभिलाषा फार महान होती. त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये तेव्हाही कुतूहल होते, आजही आहे. कदाचित अनंत काळापर्यंत हे टिकून राहील. थॉम्पसन नावाचा एक फार मोठा इंग्लिश लेखक होऊन गेलाय… त्याने एकदा म्हटलं होतं की, […]
राजगृहाचे काम पूर्ण होताच बाबासाहेबांनी प्रथम रमाईस राजगृहामध्ये आणले होते
मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर राजगृहामध्ये गुजराथी, उर्दू फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५०,००० च्या जवळपास राजगृहामध्ये ठासून भरलेले आहेत. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर ३०००, इतिहासावर २६००, कायद्यावर आधारित ५०००, धर्मशास्त्रावर २०००, चरित्रे १२००, इतर साहित्य ३०००, अर्थशास्त्र १०००, तत्व ज्ञान ६०००, युद्धशास्त्र ३००० व इतर ७९०० असा आकडा होतो. बाबासाहेब म्हणत, “अडाणी आई […]
‘फादर्स डे’ विशेष : माझा बाप दिल्लीतच आहे, त्यांचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांना विद्यार्थ्यांबद्दल विशेष काळजी वाटत असे. ते विद्यार्थ्यांना नेहमी योग्य सल्ला देत असत. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी ते जागरुक असत. मला या गोष्टीचा चांगला अनुभव आला. १९५२ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. यास्तव इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून तिकीट मागावयास दिल्लीला सर्व पार्ट्याच्या कार्यकर्त्यांची फार गर्दी झाली होती. ७ फिरोजशहा रोडवर शेड्यूल्ड कास्ट […]
जागतिक संगीत दिवस विशेष: संगीत प्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तन आणि बदलाची आमूलाग्र क्रांती केली. त्यासोबतच त्यांचं व्यक्तिमत्व हे विविधांगी आणि संपन्न व्यक्तिमत्त्व रसिक वृत्तीचं होतं. आज जागतिक संगीत दिवस असल्यामुळे बाबासाहेबांच्या संगीत प्रेमाविषयी आपण जाणून घेऊया… संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. भोवतालच्या व्यापातापाच्या गर्दीतून बाहेर निघून संगीत ऐकावे असे त्यांना वाटायचे. केवळ संगीत ऐकावे एवढीच […]