एकदा तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, “आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?” सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो.” यावर गौतम बुद्ध म्हणाले, “पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती […]
बुद्ध तत्वज्ञान
भगवान बुद्धांनी प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे धम्म शिकविला
भगवान बुद्धांनी माणसा माणसांतील असा फरक जाणून प्रत्येक माणसाला धम्म शिकविण्याची वेगवेगळी पद्धत ठेवली होती. उदारणार्थ एखाद्या भुकेलेल्या, थकलेल्या पण धम्म शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या माणसाला, त्याला पोट भरून जेवण देऊन पुरेशी विश्रांती दिल्याशिवाय ते शिकवित नसत. एकदा एका शेतकऱ्याचा बैल हरवला होता. त्या बैलाला शोधत तो दिवसभर रानावनात न खाता-पिता फिरत होता. सायंकाळी तो परत […]
मज्झीम निकाय मधील ‘ककचूपम सुत्ताचे सार’ मनुष्य जातीस कायमस्वरूपी कल्याणकारी
त्रिपिटकातील ‘सुत्तपिटक’ या मधील मज्झिम निकाय या विभागातील अनेक सुत्ते सुंदर उपदेशांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलेली आढळतात. यातील उपदेश लोकांना समजेल असा असून कल्याणकारक आहे. या मज्झिम निकाय मधील ककचूपम सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात….. “भिक्खुंनो, एखादा मनुष्य हातात कुदळ घेऊन येईल आणि म्हणेल ‘मी, या पृथ्वीचा नाश करीन’ असे बोलून तो इथे तिथे खोदू लागला, […]
अवकाशातील विश्वाबद्दल अडीज हजार वर्षांपूर्वीच भगवान बुद्धांनी सांगितले होते
आपली सूर्यमाला एका मोठया ‘मिल्की वे’ आकाशगंगेत आहे. अशा या आकाशगंगेत सुर्यासारखे लक्षावधी तारे आहेत. त्यातल्या हजारो ताऱ्याभोवती आपल्या सारखी ग्रहमाला असू शकेल.आणि अशा अनेक आकाशगंगा एका दीर्घिकेमध्ये आहेत. सध्या एकूण वीस दीर्घिकांचा कळप असल्याचे शास्त्रज्ञानां कळून आले असून अवकाशाचे हे कुरण वाढतच चालले आहे. हबल दुर्बिणीतून असंख्य गोष्टी उजेडात आल्या आहेत. यातील प्रत्येक दीर्घिके […]
किसा गौतमी : सर्व अनित्य आहे. हाच सृष्टीचा नियम आहे
किसा गौतमीचा विवाह एका व्यापारी पुत्राशी झाला होता. विवाहानंतर ती पुत्रवती झाली. हिंड फिरू लागण्यापूर्वीच दुर्भाग्याने तिचा पुत्र सर्पदंशाने मृत्यू पावला. तिने पूर्वी कधीही मृत्यू पाहिला नव्हता., त्यामुळे आपला पुत्र मृत्यूस प्राप्त झाला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सर्पदंश झाल्यास्थानी दिसणारा लहानसा लाल डाग हा तिच्या पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला म्हणून आपल्या पुत्राचे […]
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक
तथागताची देशना होती की, आत्मा नाही. तथागताची अशीही मान्यता होती की पुनर्जन्म आहे. बुद्ध परस्पर विसंगत अशा दोन सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे असे दोषारोपण करणारे काही कमी नव्हते. त्यांचा असा युक्तिवाद होता की, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा शक्य आहे. परंतु यात विसंगती नाही. आत्म्याचे अस्तित्व नसतानाही पुनर्जन्म शक्य आहे. आंब्याची कोय असते. ही कोय […]
भिक्खूने महत्त्वांच्या व्रतांचे पालन केले नाही तर तो भिक्खू राहणार नाही
बुद्धाच्या धम्मप्रचार योजनेत धम्मदीक्षेचे दोन आयाम आहेत. अन पहिली दीक्षा म्हणजे भिक्खूची दीक्षा. भिक्खूना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते. दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थांची ‘उपासक’ म्हणून दीक्षा. हे उपासक सामान्य धम्मानुगामी होत. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनपद्धतीत प्रमुख चार भेद आहेत. अन्य सर्व बाबतीत मात्र दोहोंचीही जीवनपद्धती समान आहे. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग […]
कुशल कर्म करण्याचे प्रयोजन; कुशल कर्म म्हणजे दान, शील आणि संयम
एकदा तथागत भिक्खूना उद्देशून म्हणाले, “भिक्खूनो, कुशल कर्म करण्याचे भय वाटू नये. कुशल कर्म हे सुखाचेच दुसरे नाव आहे. कुशल कर्म म्हणजे इप्सित साध्य होणे होय. प्रेयसाची प्राप्ती होय. आनंदाची उपलब्धी होय. श्रेयसाची प्राप्ती होय. भिक्खूनो, मी याचा स्वयं साक्षी आहे की, मी माझ्या कुशल कर्माची, प्रेयस, श्रेयस आणि आनंददायी फळे चिरकाळापासून भोगत आहे.” “मी […]
ह्याच जन्मी दुःखाचा अंत करणे संभवनीय आहे काय?
होय, एकदा भगवान राजगृहात गृध्रकूट पर्वतावर विहर करीत होते. अनेक जैन साधू ऋषिगिरीच्या कला-शिलेवर आसनाचा त्याग करून, उभ्या उभ्या नाना प्रकारचे कष्ट सहन करताना त्यांना दिसले. त्यांनी त्या साधूना विचारले, “भिक्खुनो! काय तुम्ही निश्चयपूर्वक जाणता की, या जन्मापूर्वी तुमचे अस्तित्व होते? असे नव्हे की, ते नव्हतेच!” “आयुष्मान! नाही.” भ. बुद्धांनी विचारले, “भिक्खूनो! काय तुम्ही जाणता […]
एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा!
प्राचीनकाळी राजगृहात एक गुंड राहात होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चन्द्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगरमस्त राही. परंतु, पूजा आणि बलिदान यांसारखे शारीरीक कष्टाचे विधी कितीही केले तरी, सतत तीन वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. […]