भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर मंगळवारी (ता. ०७) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात आंबेडकर अनुयायांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजगृहावर अज्ञातांकडून नासधूस प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया :
राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला.
राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2020
महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.