भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर मंगळवारी (ता. ०७) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात आंबेडकर अनुयायांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजगृहावर अज्ञातांकडून नासधूस प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया : राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला […]
Tag: राजगृह
असं आकाराला आलं आपल्या बाबासाहेबांचं ‘राजगृह’
ज्ञानाची प्रचंड भूक असलेल्या बाबासाहेबांची विद्यासंपन्न होण्याची अभिलाषा फार महान होती. त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये तेव्हाही कुतूहल होते, आजही आहे. कदाचित अनंत काळापर्यंत हे टिकून राहील. थॉम्पसन नावाचा एक फार मोठा इंग्लिश लेखक होऊन गेलाय… त्याने एकदा म्हटलं होतं की, […]
राजगृहाचे काम पूर्ण होताच बाबासाहेबांनी प्रथम रमाईस राजगृहामध्ये आणले होते
मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर राजगृहामध्ये गुजराथी, उर्दू फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५०,००० च्या जवळपास राजगृहामध्ये ठासून भरलेले आहेत. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर ३०००, इतिहासावर २६००, कायद्यावर आधारित ५०००, धर्मशास्त्रावर २०००, चरित्रे १२००, इतर साहित्य ३०००, अर्थशास्त्र १०००, तत्व ज्ञान ६०००, युद्धशास्त्र ३००० व इतर ७९०० असा आकडा होतो. बाबासाहेब म्हणत, “अडाणी आई […]
भगवान बुद्धांचा सोळावा वर्षावास – आलवी, भाग १८
भगवान बुद्धांनी सोळावा वर्षावास आलवी येथे व्यतित केला. आलवी हे आत्ताचे कानपूर जिल्ह्यातील, बिलहौर शहरा जवळील अरौल किंवा अरुल गांव जे कनौज आणि कानपूरच्या मार्गावर स्थित आहे. बुद्ध श्रावस्ती वरून ‘किटागिरी’ येथे पोहचले आणि तेथून आलवी येथे गेले. बुद्धकाळात किटागिरी काशी प्रदेशातील एक महत्त्वाची नगरी होती. आधुनिक काळातील उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील गोमती नदीच्या किनारी […]
भगवान बुद्धांचा नववा वर्षावास – कोसंबी, भाग ११
श्रावस्तीला असताना भ.बुद्धांना कोसंबीचे तीन श्रेष्ठ व्यापारी – घोसित, कुक्कुट आणि पावारीक हे भेटायला आले होते. बुद्धांची देशना झाल्यानंतर या तिघांनी बुद्धांना कोसंबी येथे वर्षावास करण्याची विनंती केली जी बुद्धांनी मान्य केली. संसुमारगिरी येथील वर्षावास संपल्यानंतर बुद्ध चारिका करत कोसंबी नगरीत पोहचले. कोसंबी ही बुद्धांच्या काळी प्रमुख सहा महानगरांपैकी एक होती. कोसंबी पासून राजगृह, श्रावस्ती, […]
ह्याच जन्मी दुःखाचा अंत करणे संभवनीय आहे काय?
होय, एकदा भगवान राजगृहात गृध्रकूट पर्वतावर विहर करीत होते. अनेक जैन साधू ऋषिगिरीच्या कला-शिलेवर आसनाचा त्याग करून, उभ्या उभ्या नाना प्रकारचे कष्ट सहन करताना त्यांना दिसले. त्यांनी त्या साधूना विचारले, “भिक्खुनो! काय तुम्ही निश्चयपूर्वक जाणता की, या जन्मापूर्वी तुमचे अस्तित्व होते? असे नव्हे की, ते नव्हतेच!” “आयुष्मान! नाही.” भ. बुद्धांनी विचारले, “भिक्खूनो! काय तुम्ही जाणता […]
भगवान बुद्धांचा तिसरा वर्षावास – राजगृह, भाग 6
विनय पिटकात लिहिल्याप्रमाणे, श्रावस्तीचा श्रेष्ठी सुदत्त याने बुद्धांना वर्षावास साठी विनंती केल्यानंतर, बुद्धांनी त्याला सांगितले की वर्षावाशा शून्यागार मध्ये अथवा एखाद्या वनात जिथे भिक्खूसंघासाठी सोय होत असेल अशा ठिकाणी वर्षावास केला जातो. बुद्धांचा हा होकार समजून, सुदत्तने श्रावस्ती मधील जेत राजकुमारकडून त्यांचे वन हवे त्या किमतीला विकत घेतले. याचे खूप सुंदर वर्णन विनय पिटक आणि […]
भ. बुद्धांचा दुसरा वर्षावास – सितवन, राजगृह, भाग -५
राजगृह मध्ये बुद्ध वेळूवनात राहत. अनेकवेळा ते चंक्रमन व ध्यान करण्यासाठी गृधकूट डोंगरावर भिक्खूसंघासह जात. येथे अस्साजी यांची भेट सारीपुत्त यांच्याशी झाली होती व अस्साजी यांच्या वक्तव्यावर प्रभावित होऊन ते मोग्गाल्लन यांना घेऊन बुद्धांकडे आले. याच ठिकाणी दोघांची प्रवाज्या झाली. येथील सुकरखता गुहेत बुद्धांनी दीघनख सुत्त याच गुहेत दिले होते. वेळूवन मध्ये असताना बुद्धांचा लहानपणीचा […]
बगीचा प्रेमी बाबासाहेब ; कोणालाही मोह वाटावा अशी त्यांची बाग होती
बाबासाहेब फक्त पुस्तक प्रेमी नव्हते तर त्यांना फुलझाडांचा व बागेचा सुद्धा छंद होता. त्यांच्या या छंदाबद्दल आपण जाणून घेऊ. बाबासाहेबांच्या बगिच्याविषयी बळवंतराव वराळे लिहितात, “ बाबासाहेब सायंकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपल्या बंगल्यापुढील बागेत फिरत असत. माळ्याला हाक मारीत असत. अमक्या ठिकाणी अमके झाड लाव, अशा प्रकारच्या सूचना देत असत. बाबासाहेबांना फुलझाडांचा व बागेचा छंद लहानपणापासून […]
राजगृहच्या वाटेवर सिद्धार्थासोबत हा प्रकार घडला
कपिलवस्तू सोडल्यानंतर सिध्दार्थ मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला. बिंबिसार मगधचा राजा होता. त्यावेळी थोर दार्शनिक, तत्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते.राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमा न बाळगता त्याने गंगा पार केली. राजगृहच्या वाटेवर तो सकी नामक ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. तेथून तो पद्मा नावाच्या दुसर्या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला […]